आता या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीक विम्याचा लाभ सविस्तर माहिती बघा (Pik Vima 2025)

Pik Vima 2025 : बोगस विमा भरणी प्रकरण : फक्त एक रुपया मध्ये विमा भरून पिक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांऐवजी सीएससी केंद्र अधिक पैसे छापत असल्याचे उजेडात आले.

परभणी: परभणी जिल्ह्यात एकूण 13 हजार शेतकऱ्यांच्या नावाखाली 30 हजार हेक्टर वरील (Pik Vima 2025) पिकांचा विमा बोगस पद्धतीने बदल्या गेलेला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक कार्यालयामार्फत 121 सीएससी केंद्र यांच्यावर कार्य कारवाई करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार शासनाने 121 सीएससी केंद्रांची लायसन्स रद्द केले आहे.
प्रधानमंत्री यांची पिक विमा योजनेमार्फत जिल्हाभरात दरवर्षी शेतकरी सोयाबीन, उडीद, मुंग, खरीप हंगामात कापूस इत्यादी पिके नैसर्गिक आपत्ती पासून त्यांचे संरक्षण करून वाचवतात.

दोन वर्षापासून राज्य सरकारने सर्व समावेशक पीक योजना अमलात आणलेली आहे. त्यामुळे जिल्हाभरात पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे.शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरून विमा कंपनीकडे आपली पिके संकरित करता येऊ लागली. मात्र या योजनेचा फायदा शेतकऱ्यांनी ऐवजी अशा बोगसगिरी करणाऱ्या सीएससी केंद्रावर अधिक प्रमाणात होत असल्याची घटना उजेडात आली.

त्यानंतर कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कार्यालयामार्फत जिल्हाभरामध्ये 13 हजार शेतकऱ्यांची जवळजवळ 30 हजार हेक्टर क्षेत्रावरील विमा बोगस पद्धतीने भरला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सरकारने कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे.
कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाकडे या 121 सीएससी केंद्रातून हा विमा भरला आहे. त्यामुळे बोगस पद्धतीचा विमा भरलेला असल्या प्रकरणी या सीएससी केंद्रांवर कारवाई करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर जिल्हा सरकारने 121 कारवाई केली. त्यांचे लायसन्स रद्द केले आहे. त्यामुळे सीएससी केंद्र चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

तब्बल 58 जिल्ह्यांमधील सीएससी केंद्रावर चाललेला बोगस कारभार :


प्रधानमंत्री पिक विमा योजनेमार्फत 2024 – 2025 च्या खरीप हंगामात तेरा हजार शेतकऱ्यांच्या नावाखाली तीस हजार हेक्टर जमिनीचा पिकांचा विमा बोगस पद्धतीने भरल्याचे आले समोर त्यामध्ये विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यापेक्षाही बाहेरच्या जिल्ह्यातील तब्बल 58 सीएससी केंद्रांचा समावेश आहे.(Pik Vima 2025)
यामध्ये सर्वात जास्त नांदेड, लातूर,बीड,पुणे, छत्रपती संभाजी नगर,बुलढाणा,हिंगोली,जालना, सातारा, चंद्रपूर,कल्याण, व ठाणे या जिल्ह्यातील सीएससी केंद्रांचाही परवाना रद्द करण्यात आला आहे.

परभणी जिल्ह्यातील 44 सीएससी केंद्रांवर केली कारवाई :


परभणी जिल्ह्यामध्ये शासनाने 4688 सीएससी केंद्रांची नोंदणी केली होती. मात्र त्यामध्ये जिल्हाभरात 2568 केंद्रे सद्या सुरू आहे. त्यापैकी 44 सीएससी केंद्रांनी बोगस पद्धतीने (Pik Vima 2025) विमा भरल्याचे समोर आले आहे. या एस एस सी केंद्रांवर सीएससीच्या जिल्हा व्यवस्थापकांनी कारवाई करून त्यांचा परवाना रद्द केला.

मोठी बातमी! बांधकाम कामगारांसाठी 5 लाखांपर्यंत कर्ज, GR जाहीर!

बोगस कारभारामुळे परवाना रद्द : (Pik Vima 2025)


पंतप्रधान पिक विमा योजनेमार्फत बोगस विमा (Pik Vima 2025) भरल्याप्रकरणी कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडून 121 सीएससी केंद्रांवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर केंद्रांच्या वरिष्ठांच्या सांगण्यानुसार परवाना रद्द करण्यात आला होता. यापुढे एखाद्या सीएससी केंद्राने असा गैरप्रकार केला तर त्यांचाही परवाना रद्द करण्यात येणार आहे.
जिल्हा व्यवस्थापक सीएससी केंद्र, सोमनाथ तवार.

1 thought on “आता या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीक विम्याचा लाभ सविस्तर माहिती बघा (Pik Vima 2025)”

Leave a Comment